कणकवलीच्या रूपेश कल्याणकर यांचा ‘रत्नसिंधु कराओके’ गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक.

0
38

राजापूर/प्रतिनिधी: स्वरांजली कराओके ग्रुप, राजापूरच्या वतीने आयोजित ‘रत्नसिंधु कराओके’ स्पर्धेत कणकवली येथील रूपेश कल्याणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. राजापूरच्या पाटील मळा येथील यशोदिन सृष्टीमध्ये झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 53 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.

स्पर्धेचा शुभारंभ राजापूर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संदीप मालपेकर व विनायक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. प्राथमिक फेरीत मराठी गाण्यांवर आधारित स्पर्धा झाली, ज्यातून 25 स्पर्धकांची हिंदी गाण्यांच्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.

विजेते

  • प्रथम: रूपेश कल्याणकर (कणकवली)
  • द्वितीय: दिपांजली धावडे (मंडणगड)
  • तृतीय: किशोर पवार (रत्नागिरी)

उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते:
स्वरा यादव (चिपळूण), आदीती घागरे (राजापूर), राजदिप मुरबारकर, दिप्ती अभ्यंकर.

बक्षीस वितरण

बक्षीस वितरण समारंभाला माजी आमदार सौ. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे, विनायक सावंत, सुबोध पवार, संदेश टिळेकर, गिरीष विचारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांस्कृतिक कार्यक्रम

जयश्री सुतार व चैत्राली कातकर यांनी लावणी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर संदीप देसाई यांच्या गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. लकी ड्रॉ उपक्रमात सौ. माधवी पाटील व सौ. शामला कुलकर्णी यांनी नेत्रा कलेक्शन पुरस्कृत पैठणी जिंकली.

परीक्षक व आयोजक

संगीत विशारद तेजस पवार व प्रियांका वेलणकर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धेच्या आयोजनात अध्यक्ष प्रफुल्ल दिवटे, संदीप देसाई, संदीप पवार, समीर पेडणेकर, निकेत ओगले, दीपिका पवार यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

‘रत्नसिंधु कराओके’ स्पर्धेने स्थानिक गायकांना आपली कला सादर करण्याची मोठी संधी उपलब्ध करून दिली असून प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here