कचरावेचक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम जिजाऊ संस्था करत आहे – श्री. शंभूराज देसाई (ठाणे जिल्हा पालकमंत्री)

0
27

ठाणे : “कचरावेचक मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था करत आहे,” असे गौरवोद्गार ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई यांनी काढले. जिजाऊ संस्थेने वंचित घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बोलताना त्यांनी संस्थापक निलेश सांबरे यांच्याही कार्याचे कौतुक केले.

श्री. देसाई म्हणाले, “निलेश भाऊंनी कोविड काळात समाजसेवेचा आदर्श ठेवला आहे. त्यांनी त्या काळात सेवा केलेल्या लोकांचा सन्मानही केला. मला जिजाऊ संस्थेच्या कामाचा जवळून अनुभव घेण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मला येथे पाठवले कारण त्यांनाही तुमच्या कामाची चोखपणा ठाऊक आहे.”

जिजाऊ संस्थेने आदिवासी विभागात केलेल्या कार्याचा उल्लेख करताना श्री. देसाई म्हणाले, “आदिवासी भागात आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी संस्थेने हॉस्पिटल सुरू केले आहे. या विभागातील दुर्लक्षित घटकांना मदत करण्याचे जिजाऊ संस्थेचे कार्य प्रेरणादायी आहे. शासनाकडूनही या भागाला पुरेशी मदत मिळत नाही, हे सत्य आहे, आणि त्याची जाणीव संस्थेने ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.”

जिजाऊ संस्थेने कचरावेचक मुलांच्या शिक्षण, आरोग्य, आणि विकासासाठी सातत्याने काम करत एक नवा आदर्श निर्माण केला आहे. समाजातील दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सन्मानजनक आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनवणे हेच या संस्थेचे ध्येय आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here